सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी स्थगिती त्वरीत उठवावी- माजी मंत्री आमदार अमित देशमुख


 सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी स्थगिती त्वरीत उठवावीमाजी मंत्री आमदार अमित देशमुख

मुंबईप्रतिनीधी : महाविकास आघाडी सरकारने घेतेलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाला विद्यमान सरकारने स्थगिती देऊन राज्याच्या विकास प्रक्रियेला एक प्रकारे खिळ घातली आहेअसे नमूद करुन किमान सर्वसामान्याच्या प्रश्नांशी निगडीत असलेल्या निर्णयावरील स्थगिती तातडीने उठवावी अशी मागणी माजी मंत्री वैद्यकिय शिक्षण  सांस्कृतिक कार्य अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर

 बोलताना केली.माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यातील विद्यमान सरकारच्या वैधतेवर आणि घेतल्या जात असलेल्या तुघलकी निर्णयावर घणाघाती टिका केलीते म्हणाले कीमहाराष्ट्रात सत्तांतर होऊन असे सरकार पहिल्यांदाच स्थापन झाले आहे कीज्याच्या वैधतेबाबत सर्वोच्य न्यायालयात लढाई सुरु आहेया सरकारने सत्तेत येताच महाराष्ट्राच्या हिताच्या अनेक निर्णयाला स्थगिती दिली आहेसरकार बदलले म्हणून जनतेचे प्रश्न बदलत नसतात याची जाणीव ठेऊन सरकारने स्थगिती आदेश उठवणे गरजेचे आहेमंत्रीमंडळाच्या 50 टक्के जागा रिक्त असून अजून  जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेली नाहीतत्यात मागील निर्णयाला स्थगिती असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहेमहाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ही परिस्थिती लवकरात लवकर बदलने आवश्यक आहेसत्तेत आज कोण आहेउद्या कोण येणार आहेया पेक्षा जनतेच्या प्रश्नांवर काम होणे गरजेचे आहे.मराठवाडाविदर्भ विभागात ओला दुष्काळ जाहिर कराअतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे मराठवाडा  विदर्भातील मोठे नुकसान झाले आहेविद्यमान कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार यांनी या आपदगृस्त भागाचा पाहणी दौराही केला आहेअतिवृष्टी बरोबरच गोगलगायी आणि येलो मोझॅक प्रार्दुभावामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झालेले त्यांनी पाहिले आहेत्यामुळे मराठवाडाविदर्भ विभागात ओला दुष्काळ जाहिर करावा  या विभागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.मेट्रो नको मराठवाडा वॉटर ग्रीडला निधी द्यामराठवाडा विभागात कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ असतो या संकटावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाला गती देणे गरजेचे आहेत्यामुळे शासनाने तातडीने या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भरघोस निधी देऊन लातूरउस्मानाबादबीड जिल्ह्याला न्याय द्यावा असे सांगत आम्ही मेट्रो मागत नाही असे सांगत मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली.गाळपाअभावी शिल्लक ऊस राहणार नाही याचे नियोजन व्हावेमागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्यात ऊसाचे उत्पादन भरघोस येणार आहेत्यामुळे सरकारने आताच उपाययोजना आखुन गाळपाअभावी  ऊस शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावीसाखर कारखान्यांना  आवश्यक ती मदत करावीत्याच बरोबर केंद्र सरकारला विनंती करुन साखर निर्यातीचे धोरण जाहिर करण्यास सांगावे अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.कायदा मोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावीराज्यात मागच्या दोन महिन्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहेसरकारला लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे राज्यात अनेक अप्रिय घटना घडत आहेतपोलिस विभागाकडूनच कायदा मोडला जात आहेअसे सांगुन लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे क्लबवर धाड टाकणाऱ्या पोलिसांनी तेथे अमानुष् मारहाण केल्याचे आमदार देशमुख यांनी निर्दशनास आणून दिलेकायदा मोडणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने