शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी इ-केवायसी अनिवार्य

                    शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी इ-केवायसी अनिवार्य 

उस्मानाबाद-शासनाने शेतक-यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरु केली आहे.या नुसार शेतक-यांना वर्षात तीन टप्यात प्रत्येक चार महीण्याला प्रत्येकी दोन हजार रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा केले जातात. आजतागायत दहा हफते देण्यात आले आहेत अकरावा हफता हा एप्रिल 2022 मध्ये असून त्यासाठी इ-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.त्यासाठी 31 ऑगस्ट अंतिम मुदत करण्यात आली आहे.

 इ-केवायसी साठी पासपोर्ट फोटो ओळखिच्या पुराव्यासाठी मतदान ओळखपत्र, आधार ओळखपत्र,पॅन ओळखपत्र किंवा पासपोर्ट ओळखपत्र असणे गरजेचे आहे. आपण घरी बसुन किंवा सेतु सुविधा केन्द्र मध्ये देखिल इ-केवायसी करु शकता या साठी 31 ऑगस्ट अंतिम मुदत करण्यात आली आहे.तरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर इ-केवायसी करुन घ्यावे असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

 या अधिच खरीपातील अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.
यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.


Post a Comment

أحدث أقدم