जवाब दो, जवाब दो, मोदीजी जवाब दो

 जवाब दो, जवाब दो, मोदीजी जवाब दो

औसा : प्रतिनिधी
पुलवामा येथे २०१९ साली झालेल्या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्यातील ४४ सैनिक शहीद झाले.या घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, असे वक्तव्य करणा-या सत्यपाल मलिक यांना गप्प राहण्यास सांगितल्याने केंद्र सरकारबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी औसा काँग्रेसच्या वतीने जवाब दो, जवाब दो, मोदीजी जवाब दो, असे म्हणत आंदोलन पदाधिका-यांनी तीव्र आंदोलन केले.

पुलवामा हल्ल्याप्रकरणी मलीक यांनी जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता ती का पूर्ण करण्यात आली नाही. पुलवामा घटनेत वापरलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले. पुलवामा घटनेत ४४ जवानांचे बलिदान हे भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक ंिजंकण्यासाठी केले होते काय?. मलिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम जाधव यांनी ३०० कोटी रुपयांची ऑफर का दिली. या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत. जवाब दो मोदीजी, अशी घोषणा देत औसा तहसील समोर तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपरोक्त प्रश्नांची उत्तरे द्यावीत अन्यथा काँग्रेस येणा-या काळात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जवाब दो मोदी आंदोलनातून देण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण लोखंडे, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत राचट्टे, तालुकाध्यक्ष दत्तापंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, विलासराव देशमुख युवा मंचचे रवी पाटील, निर्गुण साळुंके, ज्ञानोबा जोगदंड, बाळासाहेब सांगळे, हमीद सय्यद, अंगद कांबळे, महबूब कारभारी, अ‍ॅड. एफ एफ पटेल, शेख इस्माईल, शेख पाशा, शफिक सिद्दीकी, आप्पासाहेब घाडगे, शाम सूर्यवंशी, तानाजी जाधव, गोरख सावंत, सचिन शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. या आंदोलनात औसा तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم