पगारदार कर्मचा-यांना ६० लाखांपर्यंत गृह कर्ज

 पगारदार कर्मचा-यांना ६० लाखांपर्यंत गृह कर्ज

लातूर : प्रतिनिधी-राज्यातील जिल्हा बँकात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पगारदार कर्मचा-यांना ६० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असून यामुळे जिल्ह्यांतील पगारदार कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीला माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, जेष्ठ संचालक आमदार बाबासाहेब पाटील, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, एन. आर. पाटील, व्यंकटराव बिरादार, अशोक गोविंदपुरकर, अँड राजकुमार पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, जयेश माने, दिलीप पाटील नागराळकर, अनुप शेळके, संचालिका सौ.स्वयंप्रभा पाटील, सौ.सपना किसवे, सौ.अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव विविध खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असुन आता पगारदार कर्मचा-यांना ६० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सध्याच्या परिस्थितीत बांधकाम क्षेत्रांत होत असलेली महागाई लक्षात घेऊन निर्णय घेतला आहे. यापूर्वी बँकेकडून ३० लाख रुपयांपर्यंत गृह कर्ज मर्यादा अपुरे पडत असल्याने जिल्ह्यांतील पगारदार कर्मचा-यांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. तसेच यावर कोणतेही प्रोसेसिंग फीस खर्च आकारली जाणार नाही असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم