पीकविमा भरताना शेतकऱ्यांची लूट होता कामा नये - आ. अभिमन्यू पवार

पीकविमा भरताना शेतकऱ्यांची लूट होता कामा नये - आ. अभिमन्यू पवार 




औसा - राज्यातील महायुती सरकारने नैसर्गिक आपत्ती पासून पिकांच्या होणार्‍या नुकसानीमध्ये शेतकर्‍याला मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान पिकविमा योजनेमध्ये महत्त्वाचा क्रांतिकारी असा बदल केलेला आहे. त्यानुसार आता शेतकर्‍यांना केवळ एक रुपया प्रीमियम भरून आपला पिकविमा काढता येणार आहे. या सरकारने केलेल्या या तरतुदीचा औसा मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्‍यांनी फायदा घ्यावा आणि केवळ एक रुपया प्रीमियम भरून आपल्या पिकविमा काढावा असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे. 


                आमदार अभिमन्यू पवार यांनी (दि.१२) जुलै रोजी औसा येथील प्रशासकीय इमारतीत पीकविमा संदर्भात एसबीआय यंत्रणा, सरपंच, ग्रामसेवक व संबंधित विभागाचे प्रमुख यांच्या सोबत एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी महायुती सरकारने केवळ एक रुपया प्रीमियम भरून शेतकर्‍यांना पिक विमा योजना लागू केली आहे. याबाबत शेतकऱ्यांना या पीकविमा योजनेची सविस्तर माहिती मिळावी यासाठी एसबीआय यंत्रणा व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांची संयुक्त बैठक आयोजित केली याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, कृषी अधिकारी संजय ढाकणे, एसबीआय चे स्टेट मॅनेजर सुशील तिवारी, यावेळी आमदार अभिमन्यू पवार बोलत होते की पीकविमा भरताना शेतकऱ्यांची लूट होता कामा नये केवळ एक रुपया प्रीमियम भरून शेतकर्‍यांना आपल्या पिक विमा काढता येणार आहे. महायुती सरकारने केलेल्या या सुधारणेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा आणि औसा मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्‍यांनी आपला पिकविमा काढावा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असते. या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सदरील पीकविमा योजना सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत मंडळधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, सरपंच आदी उपस्थित होते. 

................. 


अतिरिक्त पैशाची मागणी करणाऱ्यां सीएससी सेंटरची तक्रार करावी... 



पिक विम्याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरताना प्रत्येक सीएससी सेंटर चालकांना शासनाकडून विहित रक्कम अदा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या पिक विम्याचा अर्ज ऑनलाईन सादर करताना कोणत्याही सीएससी सेंटर चालकाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता नाही. नसल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले असून आशाप्रकारे अतिरिक्त पैसे घेत असलेल्या सीएससी सेंटरची तक्रार तहसील, पंचायत समिती किंवा सीएससी केंद्राचे महाराष्ट्राचे प्रमुख मिलिंद सुयल यांच्याकडे ९६१९६१२३३२ या मोबाईल क्रमांकावर करावी असे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांनी सांगितले. 


७२ तासात द्यावी नुकसानीची माहिती.. 


नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पीकाची नुकसान भरपाई संदर्भाची माहिती पीकविमा कंपनीला देण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध असून नुकसानीची माहिती ७२ तासातच आॅनलाईन पध्दतीने किंवा टोल फ्री क्रमांकावर द्यावी काही तांत्रिक अडचणींमुळे या वेळेत ती देता आली नाही तर ती ७३ तासांनंतरही लेखी स्वरूपात शेतकरी विमा प्रतिनिधीकडे देऊ शकतात अशी माहिती एसबीआय चे स्टेट मॅनेजर सुशील तिवारी यांनी दिली..

Post a Comment

أحدث أقدم