विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन ॲग्रीच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सेलू येथे अश्ववगंधा लागवड व नोंदणी मोहिमेस प्रारंभ

 विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन ॲग्रीच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सेलू येथे अश्ववगंधा लागवड व नोंदणी मोहिमेस प्रारंभ




लातूर (प्रतिनिधी): -विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन ॲग्रीच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. १ जूलै रोजी २०२३ रोजी लातूर तालुक्यातील सेलू येथे अशवगंधा लागवड व या योजनेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी मोहिमेस प्रारंभ करण्यात करण्यात आला आहे.विलासराव देशमुख फाउंडेशन आणि ट्वेंटीवन ॲग्रीच्या संयुक्त विद्यमानाने कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे आपला कल वाढवला पाहिजे, त्याचबरोबर आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी आपले उत्पन्न  वाढ व्हावी यासाठी विविध उपयोजना यावर चर्चा करण्यात आली. आजच्या काळात एकाच पिकावर अवलंबून न राहता पर्यायी पिकाची लागवड आवश्यक आहे. यामध्ये वेगवेगळ्या सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करून आपला आर्थिक नफा वाढवावा यासाठी ट्वेंटीवन ॲग्री करीत असलेल्या औषधी वनस्पती लागवडी बाबतची सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमा बद्दलची माहिती देऊन, वृक्षारोपण करून मेळाव्याची सांगता करण्यात आली.यावेळी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, धनंजय राऊत कृषी तज्ञ) प्रगतशील शेतकरी विठ्ठल चलवाड, ज्ञानोबा सिंगापुरे, रामकिशन पाटील, जनार्धन माने, ओम अंधारे, कृषी सहाय्यक अरविंद चव्हाण, गावातील शेतकरी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अविनाश कळसे, विजयकुमार मस्के, आकाश सवाशे, सुरेंद्र गिरी, नवनाथ जाधव, पुंडलिक गव्हाणे, तुषार जाधव, मनोज गायकवाड, गजानन बोयणे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم