मराठवाड्याकडे दोन केंद्रीय मंत्रिपदे, तरीही अन्यायच

 मराठवाड्याकडे दोन केंद्रीय मंत्रिपदे, तरीही अन्यायच


लातूर/ प्रतिनिधी-मराठवाडा जनता विकास परिषद लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे यांनीही आपली कडवट प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष यंदा असताना केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन कसलीही ठोस तरतूद केली नाही. मराठवाडा विकासाचा उबाळा राहू द्या परंतु या प्रदेशाच्या अमृत महोत्सवाचे बुरुज तर केंद्र सरकारने राखायला हवे होते. 

राज्यसरकारची तर मराठवाडा विषयक अनास्था जणू टोकाला पोहोचली आहे. दिवंगत नेते विलासरावजी देशमुख यांच्या नंतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक घेऊन इथले प्रश्न ऐरणीवर घेतले नाहीत. मुख्यमंत्र्यांना तर मुंबई, ठाण्याच्या पलीकडे महाराष्ट्र आहे याचा विसर पडल्यासारखे झाले आहे. विनाअट महाराष्ट्रात सामील झाल्याची शिक्षा आम्ही भोगतो आहोत असे ते खेदाने म्हणाले. 

Post a Comment

أحدث أقدم