जागृती शुगरचे विद्यमान हंगामात ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

 जागृती शुगरचे विद्यमान हंगामात ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांची आर्थिक क्रांती घडवून आणलेल्या महाराष्ट्र- कर्नाटक- आंध्र या तिन्ही राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याने विद्यमान गाळप हंगामात ११० दिवसात ५ लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करुन त्यातून ४ लाख ९० हजार ६५०किं्वटल साखरेचे उत्पादन केले आहे तर को जनरेशन च्या माध्यमातून १ कोटी ७२ लाख ८०० युनिट वीज निर्मिती करुन निर्यात केली आहे.

मागच्या दहा वर्षापूर्वीचे सर्व गाळपाचे रेकॉर्ड मोडून यावर्षी जागृती शुगरने कमी दिवसांत जास्तीचे गाळप करुन वेगळा नवीन विक्रम केला आहे. राज्याचे माजी मंत्री जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यांच्या अध्यक्षा सौ. गौरवीताई अतुल भोसले (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या जागृती शुगरने कारखान्याच्या प्रगती बरोबर उस उत्पादक शेतक-यांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच मराठवाडा, विदर्भ राज्यात एफ. आर. पी. पेक्षा अधिक भाव देणा-या यादीत जागृती शुगर अव्वल स्थानावर राहिलेला आहे

देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर साखर कारखान्याने विद्यमान गाळप हंगामात कमी दिवसात अधिक गाळप करुन उस उत्पादक शेतक-यांना २२०० रुपये मेट्रिक टन याप्रमाणे पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा दिलेला आहे साखर कारखान्याने विद्यमान हंगामात उसाचे गाळप करण्यासाठी पारदर्शकता ठेवून अचूक कामगिरी केली असून नोंदणी प्रमाणे ऊसाचे गाळप सुरु असल्याची माहिती जागृति शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी दिली आहे.


Post a Comment

أحدث أقدم