सावरकरांच्या कार्याची ओळख करुन देण्यासाठी जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन-आ.कराड

 सावरकरांच्या कार्याची ओळख करुन देण्यासाठी

जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन-आ.कराड




          लातूर 
 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण आणि त्यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना युतीच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहेअशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.

राज्यात ३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा प्रवास करणार असून या यात्रेचा समारोप ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी होणार आहे. या गौरव यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीसप्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा - शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधीपदाधिकारी सहभागी होणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे राज्यभर मोठ्या प्रमाणात नियोजन केले जात असून लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत असून याकरिता लातूर शहर – खा. सुधाकर शृंगारेलातूर ग्रामीण – आ. रमेशअप्पा कराडनिलंगा- आ. संभाजीराव पाटील निलंगेकरऔसा- आ. अभिमन्यू पवारअहमदपूर – विनायकराव पाटीलउदगीर – सुधाकर भालेराव याप्रमाणे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची माहिती जनतेला देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होतीराहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा अवमान केला जात असल्याने सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच असे आवाहन आ. रमेशअप्पा कराड यांनी दिले.

          या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटीलमुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहेयात्रेचे विभागवार प्रमुख म्हणून - मुंबईसाठी आ. अमित साटमठाणे -कोकण - आ. निरंजन डावखरेआ.नितेश राणेपश्चिम महाराष्ट्र - प्रदेश महामंत्री  मुरलीधर  मोहोळविक्रम पावसकरउत्तर महाराष्ट्र - आ. जयकुमार रावल,  प्रदेश महामंत्री विजय चौधरीमराठवाडा - आ. संभाजी निलंगेकरप्रदेश महामंत्री संजय केणेकरपूर्व विदर्भ - आ. प्रवीण दटकेआ. विजय  रहांगडालेपश्चिम विदर्भ - आ. संजय कुटेप्रदेश महामंत्री आ. रणधीर सावरकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. 

Post a Comment

أحدث أقدم