जनतेला खोटी आश्‍वासने देवून फसविण्याचे काम केले- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 जनतेला खोटी आश्‍वासने देवून फसविण्याचे काम केले- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर-लातूर जिल्ह्यातील जनतेला उजनी धरणाचे पाणी एक महिण्यात आणू नसता आमदारकीचा राजीनामा देवू असे सांगणारे अमित देशमुख 3 वर्ष मंत्री असताना साधा प्रश्‍नही उपस्थित केला नाही. फडणवीस सरकारने मराठवाडा परिवर्तनासाठी वॉटरग्रिड योजना मंजूर करून टेंडर काढले होते. सरकार  बदलानंतर या योजनेत बंद करण्यात आले. मराठवाडा विकास मंडळ बंद पडले. तरीही आवाज उठवला नाही. जनतेला खोटी आश्‍वासने देवून सत्तेचा राजकारणाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठीच केला. अशा लोकांना जनतेने कायमचे बाजूला सारले पाहिजेत. असे आवाहन जननायक संघटनेच्यावतीने स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात आयोजित व्यापक बैठकीत अत्यंत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे हे होते.
तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी.कदम, एमएनएस बँकेचे संचालक सूभाषअप्पा सुलगुडले, जननायक संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष अप्पासाहेब पाटील, धनंजय बाचपल्‍ले, राजाभाऊ मुळे, उध्दवराज जाधव, भूजंग पाटील, कवी नरसिंग इंगळे, श्रीकांत झाडके, शमीमभाई, बालाजी शेळके, बब्रूवान पवार, सहारा शेख, सुरेखाताई मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.  
ऊस उत्पादक शेतकर्‍यांची लुबाडणूक केली
जिल्ह्यातील मांजरा, रेणा, विकास कारखान्याविरूध्द एफआरपीप्रमाणे भाव द्यावा, शेतकर्‍यांना रिक्‍वरीची माहिती द्यावी व इतर मुद्यासंदर्भात मार्च 2022 मध्ये मी स्वःताच्या नावाने हायकोर्टात रीट दाखल केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना भाव द्यावा लागणारच अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे. शेतकर्‍यांची ऊसतोड करीत असताना या सर्व कारखान्यामध्ये वाहन वाल्यांनी 2000 रूपये ऊसतोड टनाला 1200 रूपये मशीन तोड 12000 रूपये पेक्षा अधिक घेतल्याची तक्रार अनेक लोकांनी यापूर्वी केली व बैठकीतही केली. या शेतकरी लुटीला साखर कारखानदार जबाबदार आहेत. याविरूध्द आपण शासनाकडे तक्रार करू असेही कव्हेकर साहेब म्हणाले.
येणार्‍या निवडणुका ताकतीने लढू
येत्या काळात मार्केट कमिटी, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. लातूर मार्केट कमिटी सन 1993 मध्ये आपण मुदत संपल्यामुळे बाजूला झालो. त्या काळात मूरूड, रेणापूर,लातूरला जी उभारणी झाली. त्यामध्ये नवीन काहीही झालेले नाही. उलट शेतकरी कामगार यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पुढील काळात येणार्‍या निवडणुका सत्ताधार्‍यांच्या विरोधात ताकतीने लढवून जनतेला व संस्थेला न्याय देवू असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या उपस्थिती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जननायक संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मारूती सूर्यवंशी यांनी केले. प्रारंभी कमलाकर डोके, परिक्षीत सांडूरर, निळकंठराव पवार, बी.टी.कदम, बाबासाहेब देशमुख, शिवपूजे मॅडम आदींनी विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अब्दल गालीब शेख यांनी मानले.  यावेळी या बैठकीला शिवराम कदम, सूर्यकांत मुंडे, राजेसाहेब देशमुख, सूर्यकांत शिंदे, केदार पाटील, भरत जाजू शेठ, बळीराम ढमाले, संभाजी सूरवसे, बापू शिंदे, नितिन शिंदे, तुकाराम गव्हाणे यांच्यासह जननायक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
जननायक संघटनेच्या माध्यमातून संघटन वाढविण्याचे काम करू
- सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
सत्तेत नसतानाही जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर येण्याचे काम कव्हेकर परिवाराने केलेले आहे. आपल्या लातूर ग्रामीणचे आमदार जनतेच्या प्रश्‍नासाठी कधी विधानसभेमध्ये आवाज उठवत नाहीत. असा एकही विषय दाखवा त्याला मी बक्षीस देईन असे आवाहन करीत भविष्यातील राजकीय वाटचालीत पक्षापेक्षा व्यक्‍ती महत्त्वाचा समजून कव्हेकर साहेबांच्या पाठीशी उभे रहा यासाठी गावोगावी जननायक संघटनेच्या शाखा स्थापन करून जननायक संघटनेचे संघटन वाढविण्याचे काम आपण जोमाने करू असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढवू- बाबासाहेब कोरे
जननायक संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम कव्हेकर साहेब गेल्या चाळीस वर्षापासून करीत आलेले आहेत. ही लातूर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. परंतु पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकतीने लढवून सत्तेबरोबरच विकासाच्या प्रवाहात राहण्याचे काम आपण करू असे प्रतिपादन जननायक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोरे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم