जनतेचे लक्ष मुलभूत प्रश्नापासून विचलित करणा-या केंद्र सरकारचा निषेध

 जनतेचे लक्ष मुलभूत प्रश्नापासून विचलित करणा-या केंद्र सरकारचा निषेध

लातूर : प्रतिनिधी
जनतेचे लक्ष मुलभूत प्रश्नांपासून विचलित करणा-या केंद्र सरकारच्या निषेधार्थ लातूर जिल्हा महिला कॉंगेस (ग्रामीण) कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेच्या महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना यावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करण्यासोबतच कॉंग्रेस नेत्याचे, महिलांचे चारिर्त्य हनन करण्याचा देखील प्रयत्न चालू आहे. देशाच्या राजकारणाची पातळी खाली आणण्याचे काम भाजपकडून गेल्या काही वर्षात सुरु आहे.

याला पायबंद घातला जावा अन्यथा महिला कॉंग्रेसकडून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा, इशारा देत केंद्र सरकार व भाजपचा लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस (ग्रामीण) कडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस(ग्रामीण) च्या वतीने मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी लातूर यांना देण्यात आले. यावेळी सुनीता अरळीकर, सीमा क्षीरसागर, मीनाक्षी जगताप, सविता पवार, संगीता पतंगे, रोहिणी शिंदे, सुरेखा गायकवाड यांच्यासह लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस (ग्रामीण) च्या महिला पदाधिकारी, सदस्य उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने