सर्पमिञांना सरकारने शासन स्तरावर अधिकृत ओळख द्यावी - माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

सर्पमिञांना सरकारने शासन स्तरावर अधिकृत ओळख द्यावी - माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे
लातूर/प्रतिनिधी : सर्पमिञांना सरकारने शासन स्तरावर अधिकृत ओळख द्यावी या प्रमुख मागणीसाठी लातूरात राज्यस्तरीय सर्पमिञ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर नेता न्युज चॅनेल च्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या संमेलनासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यातून पाचशे बावीस सर्पमिञांनी सहभाग नोंदविला होता. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे उपस्थित होते ते उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगत होते कि सर्पमिञ हि आता समाजाची निकडीची गरज होत चालली आहे. ते आपले वैयक्तिक जिवन विसरुन आपला जिव धोक्यात घालून साप पकडतात त्यांच्या शिवाय घरातला साप काढणे शक्य नाही तर सर्पमिञांची सरकारने शासन स्तरावर ओळख द्यावी हि मागणी रास्त असुन मि तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत तुमच्या सोबत आहे असे आश्वासित केले आहे. 

संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावर राम भुतकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. दिलीप पुंडे, अनिस राज्य कार्यवाहक माधव बावगे, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  सुधाकर बावकर, सहायक पोलीस निरीक्षक  अनिल कांबळे, दगडुसाहेब पडिले, सर्पमिञ अशोक शेट्टी, कृष्णा घुले, सुभाष घुले, नागेश जाधव, धनंजय गुट्टे, ॲड.राहुल कांबळे, डाॅ.महेश शिंदे यांची उपस्थिती होती. तर डाॅ.दिलीप पुंडे यांनी सर्पंशावरील उपचार, सर्पदंशाने कोमात गेलेले रुग्ण शहाण्णव तासानंतर पण बरे होतात त्याचे जिवंत उदाहरणे आपल्या सञात दाखवली. सर्पदंश होऊ नये यासाठी काय उपचार पद्धती अवलंबल्या जातात याचे प्रात्यक्षिकांसह स्पष्टिकरण दिले आहे. सर्प विज्ञान चळवळ काल आज आणि उद्या या विषयावर सर्पमिञ हि संकल्पना देशात कशी आली यावर मत व्यक्त केले तर कर्नानटकातील अगुंबे येथे किंग कोब्रा सापाचे प्रजनन प्रक्रिया केंद्रातील तज्ञ श्री अजय गिरी यांनी सापाला हात न लावता साप कसा पकडायचा याचे नव्याने विकसित केलेले तंत्र त्यांनी दाखवले यामुळे साप मरणार नाही आणि सर्पमिञांना सर्पदंश होणार नाही याची व्यक्त केली. साप वन्यजीव व कायद्या बाबत ॲड राहुल कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. तर या संमेलनात सर्वानुमते सर्पमिञांना शासन स्तरावर अधिकृत ओळख निर्माण करुन द्यावी, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत किमान मानधनावर स्वयंसेवक म्हणून सक्रिय करावे, सर्पमिञांना आरोग्य विमा, अपघात विमा व सुरक्षा साधणांसाठी निधी राखीव करावा या मागण्यांबाबत सकारात्मक ठराव पारित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुञसंचलन सुशील वाघमारे यांनी तर आभार दगडुसाहेब पडिले यांनी व्यक्त केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी अभिजीत गायकवाड, श्याम कांबळे, अनिल गरुड, माणिक कल्लुरे, सिद्धार्थ चव्हाण, रमेश काळे, आकाश रेगुडे, आकाश कदम, आकाश मिरगे, सचिन सुरनर, कान्हा पांचाळ, अमोल शिरुरकर, गोरख खेडकर, प्रमोद पुरी, सचिन क्षिरसागर, गणेश देशमुख, हणमंत पाटील यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्पमिञांनी परिश्रम घेतले आहे.

Post a Comment

أحدث أقدم