व्हॉईस ऑफ मीडियाचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

 व्हॉईस ऑफ मीडियाचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन


लातूर / प्रतिनिधी-व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने माहिती संचालनालयाच्या माध्यमातून महत्त्वाचे असलेल्या विविध मागणीसाठी मंगळवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 
ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.)
राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने द्यावी. 
माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियोआणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा.
अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत. सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी.
सोशल मीडियालाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी. या मागण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बालाजी फड, जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार व सुशांत सांगवे, जिल्हा सरचिटणीस संगम कोटलवार, टेलिव्हिजन विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष निशांत भद्रेश्वर, टेलिव्हिजन विभागाचे प्रदेश संघटक दीपरत्न निलंगेकर, साप्ताहिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वामन पाठक, डिजिटल विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सितम सोनवणे, साप्ताहिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विष्णू अष्टेकर, संघटक सचिन चांडक, योगीराज पिसाळ, उपाध्यक्ष अजय बोराडे पाटील, विनोद चव्हाण, आनंद माने, कोषाध्यक्ष श्रीराम जाधव, प्रवक्ते अनिल पुरी, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जाधव, लातूर तालुकाध्यक्ष प्रभाकर शिरुरे, रामेश्वर धुमाळ, काकासाहेब घुटे, विजय कवाळे, माऊली परांडेकर, लातूर तालुकाध्यक्ष प्रभाकर शिरुरे, रेणापूर तालुका अध्यक्ष विठ्ठल कटके, चाकूर तालुका अध्यक्ष विनोद नीला, अहमदपूर तालुकाध्यक्ष रविकांत क्षेत्रफळे, औसा तालुका अध्यक्ष विजय बिराजदार, निलंगा तालुका अध्यक्ष परमेश्वर शिंदे, उदगीर तालुका अध्यक्ष गणेश मुंडे, देवणी तालुका अध्यक्ष प्रा. रेवण मळभागे, जळकोट तालुका अध्यक्ष अमोल कळसे, आदींनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم