मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवितेवर बोलू काही” कार्यक्रमाचे आयोजन

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवितेवर बोलू काही” कार्यक्रमाचे आयोजन
लातूर/ प्रतिनिधी- हरिहर प्रतिष्ठान संचलित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रा.) वाणिज्य महाविद्यालयात दि.24.01.2024 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवितेवर बोलू काही” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण होत्या. प्रमुख अतिथी प्रसिध्द कवयित्री सुलोचना मुळे या होत्या. प्रमुख उपस्थिती डॉ. विद्यादेवी कांबळे व डॉ. नयन भादूले यांची होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्यादेवी कांबळे यांनी केले. प्रमुख अतिथी कवयित्री सुलोचना मुळे यांनी कवितेवर भाष्य करत देशप्रेम, देशभक्ती, नातेसंबंध, वृक्षप्रेम इ. दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश क्षिरसागर यांनी केले तर आभार डॉ. नयन भादूले यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने