घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध -आ. रमेशअप्पा कराड

                         घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध -. रमेशअप्पा कराड


        लातूर :- नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय घेऊन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगावली आहे. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठरावीक घराण्यांची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल या भीतीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असलातरी हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा सरकारने आदर केला आहेअशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे सांगून आ. कराड म्हणाले की जनतेतून नगराध्यक्ष

 आणि सरपंच व्हावा हीच जनतेचीही मागणी असताना या निर्णयास महाविकास आघाडीतील पुढार्‍यांनी विरोध करून घराणेशाहीची मानसिकता स्पष्ट केली आहे.जनतेतून नेतृत्वाचा उदय होऊ नये व सत्तेची सगळी केंद्रे आपल्या मुठीतच रहावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत प्रयत्न केले. आता जनतेच्या भावनांचा आदर करणारे सरकार सत्तेवर आले आहे. सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेऊन भाजप-शिवसेना सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाही विरोधी मोहिमेचा मुहूर्त महाराष्ट्रात केला आहेअशा शब्दांत आ. रमेशअप्पा कराड यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने