समनक जनता पार्टीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी जाधव यांची निवड

समनक जनता पार्टीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी जाधव यांची निवड
 लातूर- 
 समनक जनता पार्टीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी जयसिंग जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संपत भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.एप्रिल महिन्यामध्ये (ता.माहूरगड जि.नांदेड )येथे हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायासमोर समाजातील उपेक्षित वंचित शोषित शेतमजूर आदी घटकांना न्याय मिळावा यासाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन समनक जनता पार्टीचे लोकार्पण केले असल्याचे अध्यक्ष प्रा.चव्हाण यांनी सांगितले.
  या बैठकीमध्ये ऍड.अण्णाराव पाटील,प्रा.अनिल राठोड,सेवानिवृत्त तहसीलदार एल.टी.चव्हाण,राजाभाऊ जाधव,गोर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक चव्हाण,गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष बबलू जाधव,ऍड.राजेंद्र गाडे,शिकवाडीचे सुरेश राठोड,ऍड.संतोष पवार,दयानंद राठोड,ओमकार रामावत आदी जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंग जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
  जयसिंग जाधव हे मौजे वरवटी (ता.लातूर) येथील रहिवासी असून बंजारा समाजातील विविध सामाजिक,राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची अग्रगण्य भूमिका असल्यामुळे त्यांची सर्वानुमते समनक जनता पार्टीच्या लातूर जिल्हा जिल्हाध्यक्षपदी निवड करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.या निवडीबद्दल जिल्हयातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने