लातूर जिल्हा काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा

लातूर जिल्हा काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा
लातूर / प्रतिनिधी-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी मंत्री आमदार अमित देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार असून पदयात्रेत पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्ह्यातील सर्व गावांत जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी करून लोकांशी संवाद साधणार आहेत. ही पदयात्रा ३ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर निघणार असून यात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले आहे.
लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांची काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा काँग्रेसचे विविध सेलचे जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात प्रवीण पाटील (विधी सेल), सुलेखा कारेपूरकर (पर्यावरण सेल), रामलिंग स्वामी (परिवहन सेल), राजीव कसबे (निराधार सेल) यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हा काँग्रेसच्या आयोजित बैठकीला जिल्ह्यातील सर्व विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कॉंग्रेसचे पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने