लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालत

 लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालत

 

लातूर:   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशानुसार ९ डिसेंबर, २०२३ रोजी लातूर जिल्ह्यातील सर्वं तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात, भू-संपादन, १३८ एन.आय. अॅक्ट, कौटुंबिक प्रकरणे, बॅंक वसुली प्रकरणे, कामगार, सहकार न्यायालय, वीज व पाणी बिल प्रकरणे, पगार व भत्ते प्रकरणे आणि सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे व इतर दिवाणी प्रकरणे तसेच वादपुर्व प्रकरणे, बॅक वसुली प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी बिल प्रकरणे, दूरध्वनी अथवा मोबाईल कंपन्यांची प्रकरणे अशा सर्व प्रकारची तडजोडयोग्य प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये भूसंपादनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून संबंधित शासकीय भू-संपादन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी आपल्या वकिलांशी त्वरीत संपर्क करुन त्यांच्या भू-संपादनाची प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अपघात दावा प्रकरणांमध्ये संबंधित विमा कंपन्यांची जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत प्रयत्न होणार असून त्यामुळे ज्या पक्षकारांची अपघात दावा प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांनी आपापली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्यासाठी संबंधित वकिलांशी व न्यायालयाशी संपर्क करावा. त्याचप्रमाणे कौटुंबिक, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमाने मिटविण्यासाठी संबधित पक्षकारांनी पुढाकार घ्यावा.

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षकार, विधिज्ञ व संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या. सुरेखा कोसमकर, सचिव न्या. एस.डी. अवसेकर, जिल्हा सरकारी वकिल अॅड. संतोष देशपांडे अॅड. जिल्हा विधिज्ञ मंडळ अध्यक्ष महेश बामनकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने