सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची ओळख निर्माण करु
-चेअरमन माजी मंत्री आ. अमित देशमुख
लातूर प्रतिनिधी :
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उदयास आलेली विलास को-ऑपरेटीव्ह बँक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी योग्य नियोजन आणि कडक शिस्तीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जो आदर्श निर्माण केला आहे, त्याचे अनुकरण करुन या बँकेतून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम घडेल, अशी ग्वाही देताना बँकेचे चेअरमन, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ही बँक सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखली जावी यासाठी सदैव जागरुकता दाखवली जाईल, असे आश्वासन दिले़.
शेतकरी, मजूर, लहान व्यावसायिक, लघुउद्योगजक, यांना वेळेत पतपुरवठा करुन त्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडवण्याचा उद्देश ठेऊन स्थापना झालेल्या विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची २१ वी अधिमंडळाची वार्षिक सभा दि़. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील रिंग रोडवरील स्वानंद बॅक्वेट हॉलमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली़. त्यावेळी त्यानी उपरोक्त आश्वासन दिले़.
या सभेस माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकते, बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत कातळे, सदस्य ॲड़. किरण जाधव, ॲड़. समद पटेल, रमेश थोरमोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय साळुंके, जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, सपना किसवे, अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी बोलतांना विलास को-ऑपरेटीव्ह बँक स्थापन करण्यामागील उद्दिष्टांची पूर्तता करुन अग्रगण्य नागरी बँक म्हणून नावावर रुपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, आगामी काळात अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध केल्या जातील. शेतकरी आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेत, अशी धोरणे बँकेमार्फत राबवण्यात येतील. जग बदलत चालले आहे़ नव्या संकल्पना पुढे येत आहेत़ याचा विचार केल्याखेरीज आता भवितव्य नाही़ दोन दशकात बँकेने सव्वादोन कोटी ठेवी गाठणे शक्य नाही, परंतू, हे काम सर्वांच्या सहकार्याने करता आले आहे़ सामान्य माणसाला विकास को-ऑपरेटीव्ह बँक ही आपली आहे, असे वाटले पाहिजे़ ती प्रतिमा निर्माण करण्याच्या हेतूनेच बँक कार्यरत आहे़. बँकेच्या सभासदांनीसुद्धा बँकेचा प्रचार या दृष्टीने करणे आवश्यक आहे़. ठेवीदार व कर्जदार मोठा झाला पाहीजे तरच बँक मोठी होते, हे सुत्र स्विकारले पाहिजे, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, पारदर्शक आणि गुणवत्ता प्रदान काम बँकेच्याया माध्यमातून होत आहे़. केवळ संचालकांच्याच नव्हे तर आता बँकेच्या हितचिंतकांनीही कर्जासाठी एखाद्याची शिफारस केली तर तिही ग्राह्य धरली जाणार आहे़. बँकेचा विस्तार वाढविण्यासाठी इतर चांगल्या बँकांसोबत जॉर्इंट व्हेंचर करावे लागणार आहे़, नेटबँकिंगही करावी लागणार आहे़. लातूर शहरातील सर्व घरांचा परिचय बँकेला आणि बँकेचा परिचय सर्व घरांना असला पाहिजे़. दारापर्यंत जाऊन सेवा देणारी बँक म्हणून बँकेची प्रतिमा निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़.
यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथराव शिंदे, यांनी राज्यातील सहकाराला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिशा दिली आहे़. लातूर जिल्ह्यात सहकार चळवळ जिवंत आहे ती सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्यामुळे़ गोरगरीबांना मोठ करणारी सहकार चळवळ असून त्यात विलास को-ऑपरेटीव्ह बँकही माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपले योगदान देत आहे़ असे सांगितले.
छोट्या-छोट्या व्यवसाय कर्जाला नागरी बँका आणि ठेवीला मात्र राष्ट्रीयकृत बँका, असे का?, असा प्रश्न उपस्थित करुन अशोक गोविंदपूरकर म्हणाले, विकारत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारामुळे सहकाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे़. तर अभय साळूंके यावेळी बोलताना म्हणाले, शिस्तीशिवाय सहकार चळवळ आणि सहकारी बँका चालत नाहीत, ती शिस्त मांजरा परिवाराने पाळल्यानेच जिल्ह्यात सहकाराचे जाळे पसरले आहे़.
प्रारंभी या आर्थिक वर्षात दिवंगत झालेले थोर नेते, देशभक्त, शास्त्रज्ञ, संशोधक, जवान, कलावंत, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक व सहकारी कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी, लेकख, कवी, ज्येष्ठ खेळाडू तसेच बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार यांना दोन मिनीटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे यांनी सभेपूढील विषये मांडले, त्यास सभागृहाने टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले़, तसेच सपाटे यांनी यावेळी अहवालही सादर केला़. प्रारंभी बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकते, संचालक सूर्यकांत कातळे, अनिल शिंदे, सुरेश धानूरे, अरुण कामदार, प्रा़ डॉ़ जयदेवी कोळगे, ख्वाजाबानू अन्सारी, सुनिल पडीले, पंडित कावळे, प्रविण घोटाळे, नेताजी बादाडे, ॲड़ किरण जाधव, व्यंकटेश पुरी यांनी उपस्थिती पाहूण्यांचे स्वागत केले़.
कार्यक्रमास महादेव मुळे, चंद्रचुड चव्हाण, मनोज पाटील, संगम कोटलवार, युवराज जाधव, चंद्रकांत धायगूडे, रवी बरमदे, योगेश दारफळकर, प्रविण चेवले, सलीम उस्ताद, विजय धुमाळ, मल्लीकार्जून वाघमारे आदी उपस्थित होते.
या अधिमंडळाच्या वार्षिक सभेस बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते़. सभेचे सुत्रसंचालन राहूल इंगळे-पाटील यांनी केले तर तज्ज्ञ संचालक व्यंकटेश पुरी यांनी आभार मानले़.
सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटीव्ह
बँकेची ओळख निर्माण करु
बँकेच्या २१ व्या अधिमंडळाच्या सभेत
बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले आश्वासन
1️⃣ अग्रगण्य नागरी बँक म्हणून नावावर रूपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
2️⃣ अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध केल्या जातील.
3️⃣ सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटिव बँक ओळखली जावी
4️⃣ शेतकरी, आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेत
5️⃣ शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरमध्ये बँकेमार्फत शैक्षणिक कर्ज योजना
लातूर प्रतिनिधी :
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उदयास आलेली विलास को-ऑपरेटीव्ह बँक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी योग्य नियोजन आणि कडक शिस्तीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जो आदर्श निर्माण केला आहे, त्याचे अनुकरण करुन या बँकेतून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम घडेल, अशी ग्वाही देताना बँकेचे चेअरमन, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ही बँक सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखली जावी यासाठी सदैव जागरुकता दाखवली जाईल, असे आश्वासन दिले़.
शेतकरी, मजूर, लहान व्यावसायिक, लघुउद्योगजक, यांना वेळेत पतपुरवठा करुन त्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडवण्याचा उद्देश ठेऊन स्थापना झालेल्या विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची २१ वी अधिमंडळाची वार्षिक सभा दि़. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील रिंग रोडवरील स्वानंद बॅक्वेट हॉलमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली़. त्यावेळी त्यानी उपरोक्त आश्वासन दिले़.
या सभेस माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकते, बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत कातळे, सदस्य ॲड़. किरण जाधव, ॲड़. समद पटेल, रमेश थोरमोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय साळुंके, जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, सपना किसवे, अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी बोलतांना विलास को-ऑपरेटीव्ह बँक स्थापन करण्यामागील उद्दिष्टांची पूर्तता करुन अग्रगण्य नागरी बँक म्हणून नावावर रुपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, आगामी काळात अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध केल्या जातील. शेतकरी आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेत, अशी धोरणे बँकेमार्फत राबवण्यात येतील. जग बदलत चालले आहे़ नव्या संकल्पना पुढे येत आहेत़ याचा विचार केल्याखेरीज आता भवितव्य नाही़ दोन दशकात बँकेने सव्वादोन कोटी ठेवी गाठणे शक्य नाही, परंतू, हे काम सर्वांच्या सहकार्याने करता आले आहे़ सामान्य माणसाला विकास को-ऑपरेटीव्ह बँक ही आपली आहे, असे वाटले पाहिजे़ ती प्रतिमा निर्माण करण्याच्या हेतूनेच बँक कार्यरत आहे़. बँकेच्या सभासदांनीसुद्धा बँकेचा प्रचार या दृष्टीने करणे आवश्यक आहे़. ठेवीदार व कर्जदार मोठा झाला पाहीजे तरच बँक मोठी होते, हे सुत्र स्विकारले पाहिजे, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, पारदर्शक आणि गुणवत्ता प्रदान काम बँकेच्याया माध्यमातून होत आहे़. केवळ संचालकांच्याच नव्हे तर आता बँकेच्या हितचिंतकांनीही कर्जासाठी एखाद्याची शिफारस केली तर तिही ग्राह्य धरली जाणार आहे़. बँकेचा विस्तार वाढविण्यासाठी इतर चांगल्या बँकांसोबत जॉर्इंट व्हेंचर करावे लागणार आहे़, नेटबँकिंगही करावी लागणार आहे़. लातूर शहरातील सर्व घरांचा परिचय बँकेला आणि बँकेचा परिचय सर्व घरांना असला पाहिजे़. दारापर्यंत जाऊन सेवा देणारी बँक म्हणून बँकेची प्रतिमा निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़.
यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथराव शिंदे, यांनी राज्यातील सहकाराला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिशा दिली आहे़. लातूर जिल्ह्यात सहकार चळवळ जिवंत आहे ती सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्यामुळे़ गोरगरीबांना मोठ करणारी सहकार चळवळ असून त्यात विलास को-ऑपरेटीव्ह बँकही माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपले योगदान देत आहे़ असे सांगितले.
छोट्या-छोट्या व्यवसाय कर्जाला नागरी बँका आणि ठेवीला मात्र राष्ट्रीयकृत बँका, असे का?, असा प्रश्न उपस्थित करुन अशोक गोविंदपूरकर म्हणाले, विकारत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारामुळे सहकाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे़. तर अभय साळूंके यावेळी बोलताना म्हणाले, शिस्तीशिवाय सहकार चळवळ आणि सहकारी बँका चालत नाहीत, ती शिस्त मांजरा परिवाराने पाळल्यानेच जिल्ह्यात सहकाराचे जाळे पसरले आहे़.
प्रारंभी या आर्थिक वर्षात दिवंगत झालेले थोर नेते, देशभक्त, शास्त्रज्ञ, संशोधक, जवान, कलावंत, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक व सहकारी कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी, लेकख, कवी, ज्येष्ठ खेळाडू तसेच बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार यांना दोन मिनीटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे यांनी सभेपूढील विषये मांडले, त्यास सभागृहाने टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले़, तसेच सपाटे यांनी यावेळी अहवालही सादर केला़. प्रारंभी बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकते, संचालक सूर्यकांत कातळे, अनिल शिंदे, सुरेश धानूरे, अरुण कामदार, प्रा़ डॉ़ जयदेवी कोळगे, ख्वाजाबानू अन्सारी, सुनिल पडीले, पंडित कावळे, प्रविण घोटाळे, नेताजी बादाडे, ॲड़ किरण जाधव, व्यंकटेश पुरी यांनी उपस्थिती पाहूण्यांचे स्वागत केले़.
कार्यक्रमास महादेव मुळे, चंद्रचुड चव्हाण, मनोज पाटील, संगम कोटलवार, युवराज जाधव, चंद्रकांत धायगूडे, रवी बरमदे, योगेश दारफळकर, प्रविण चेवले, सलीम उस्ताद, विजय धुमाळ, मल्लीकार्जून वाघमारे आदी उपस्थित होते.
या अधिमंडळाच्या वार्षिक सभेस बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते़. सभेचे सुत्रसंचालन राहूल इंगळे-पाटील यांनी केले तर तज्ज्ञ संचालक व्यंकटेश पुरी यांनी आभार मानले़.
टिप्पणी पोस्ट करा