कार्तिकी एकादशी निमित्ताने लातुर- पंढरपूर विशेष रेल्वेगाडी-खा. सुधाकर शृंगारे

 कार्तिकी एकादशी निमित्ताने लातुर- पंढरपूर विशेष रेल्वेगाडी-खा. सुधाकर शृंगारे




(लातुर-प्रतिनिधी) कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी लातुर ते पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली आहे. लातुर जिल्ह्यातून सलग पाच दिवस धावणाऱ्या या रेल्वेगाडीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे.

कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी  हजारो भाविक पंढरपूरला जात असतात.  लातुरसह,नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातून पंढरपूरकडे ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे  खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे  ही विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी केली होती. लातुर-पंढरपूर  रेल्वेगाडी क्रमांक-01419, ही गाडी 1 नोव्हेंबर,2 नोव्हेंबर ,4 नोव्हेंबर,7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर, रोजी सकाळी 7.30 वाजता लातुर स्टेशन वरून सुटेल.पंढरपूर येथे दुपारी 12.25 वाजता पोहचेल. तर पंढरपूर येथून लातुर साठी विशेष दुसरी रेल्वेगाडी क्रमांक 01420 ही  14.30 वाजता सुटेल.1,2,4,7 आणि 8 नोव्हेंबर रोजी सोडण्यात आली आहे. लातुर, हरंगुळ,औसा रोड, मुरुड,ढोकी,कळंब रोड,येडशी,उस्मानाबाद,बार्शी, कुर्डुवाडी,मोडलिंब, पंढरपूर या स्टेशनवर थांबणार आहे. या व्यतिरिक्त लातुर रेल्वे स्टेशनवरून  आदीलाबाद-पंढरपूर,बिदर-पंढरपूर या रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र  लातुर-पंढरपूर आणि पंढरपूर-लातुर रेल्वेच्या सर्वात जास्त म्हणजे पाच फेऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत,या गाडीचा भाविक भक्तानी लाभ घ्यावा आणि सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने