चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा : सुभेदार तान्हाजीराव मालुसरे

 चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा : सुभेदार तान्हाजीराव मालुसरे


सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा आजवरच्या बखरकारांनाइतिहासाच्या अभ्यासकांनाललित लेखकांनाचित्रपट व नाट्य निर्माता- दिग्दर्शकांना आणि अभिनय करणाऱ्या कलाकांराना सतत प्रेरणादायी ठरला आहेदेशातील अनेक जण या अद्वितीय पराक्रमी सामर्थ्यवान पुरुषोत्तमाचे चरित्र अभ्यासून भारावले गेले आहेतआणि ह्या वीरपुरुषाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेतयापुढेही ते मांडत राहाणार आहेतकारण शिवचरित्र अखंड 'प्रेरणादायीतर शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे प्रसंगी बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा 'गनिमी कावाअवलंबणारे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान !  छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी आपली निष्ठा ठेवण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो काय अन  त्यांच्याशी इतका समरस होतो कायकी स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून जातोअन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अमोल देह स्वामीनिष्ठेचरणी अर्पण करीत धारातीर्थी पडतो काय.  म्हणून तानाजी मालुसऱ्यांसारखे वीरपुरुष आपली जीवनगाथा लिहून अजरामर झाले ! युगानुयुगे येतील पण तानाजी मालुसरे - सूर्याजी मालुसरे यांचा इतिहास सातत्याने नवीन पिढीला प्रेरणादायी ठरत राहणार आहे. चलतचित्रपटातील पडद्यावरील एखादी कलाकृती श्रेष्ठ ठरते ती दिग्दर्शकामुळे. हल्ली चित्रपटसृष्टीला ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची भुरळ पडलेली आहे. आजपर्यंत तानाजीरावांच्या पराक्रमी इतिहासाची भुरळ कलामहर्षी बाबुराव पेंटरचित्रतपस्वी व्ही. शांतारामज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाळेओम राऊत आणि आता दिग्पाल लांजेकर यांना पडल्याने ही ऐत्याहासिक कलाकृती भव्य स्वरूपात मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पाच चित्रपटांचा हा मागोवा –

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर व निर्माते प्रद्योत पेंढरकर यांचा "सुभेदार"  (२०२३ )

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं कीआपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. ‘आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’ म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजे निष्ठात्यागसमर्पण याचे मूर्तिमंत उदाहरण ही ओळख पटते. प्रचंड कर्तव्यनिष्ठा दाखवत स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्याच्या चाकरीपुढं आपल्या संसाराचेही भान नव्हतं. स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून गेला अन् वचनाच्या पूर्ततेसाठी मागं न हटता आपला देह स्वामी निष्ठेपायी शिवप्रभूंच्या चरणी ठेवला.  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकला आहे. यासंदर्भात लांजेकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलेअखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे शिवछत्रपतींच्या योध्यांपैकी महत्वाचे नाव ! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडावरची लढाई नव्हेतर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होतेकोंढाणा जिंकण्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्यरणनितीशत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. इतिहास मांडताना तो भव्यदिव्य तर दाखवायचा प्रेक्षकांच्या काळजालाही भिडवायचा होता. त्यादृष्टीने कथासादरीकरणऐतिहासिक संदर्भत्याकाळातील भाषाशस्त्रास्त्रेवेशभुषेपासून अगदी अजय पुरकर यांचा अभिनयापर्यंत,  मावळ प्रांतातील भाषा याचा वापर केला. सुभेदार’ चित्रपटाविषयी सांगताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, “तानाजीराव मालुसरे हे विलक्षण योद्धा होते. शूर योद्धा असण्याबरोबरच तानाजीराव प्रशासकीय कामातही खूप हुशार होते. कोकणात जाणाऱ्या अनेक रस्त्यांचे काम त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकामात सुद्धा त्यांचा काही अंशी सहभाग होता. प्रशासक म्हणून ते महाराजांच्या आणि आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कसे तयार झालेत्यांनी स्वराज्यासाठी कसे काम केले हे दाखवण्याचा प्रयत्न ‘सुभेदार’मधून करण्यात आला आहे. “‘सुभेदार’ असे चित्रपटाचे नाव ठेवण्यामागे खास कारण आहे ते म्हणजे, ‘सुभेदार’ म्हणून ‘प्रशासकीय’ आणि ‘सैन्य’ अशी दुहेरी जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी सांभाळली होती. अशा दोन्ही प्रकारचे किंवा विभागांचे ‘सुभेदार’ एकच व्यक्ती असणे हे इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.”  “तुम्ही नेहमी जसा बायोपिक पाहता तसा सुभेदार चित्रपट नसेल. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे भावरुपात्मक टप्पे जसे कीसुभेदारांचे आणि आऊसाहेबांचे नातेत्यांचे आणि शिवाजी महाराजांचे नाते कसे होतेया गोष्टी पाहायला मिळतील. तानाजी मालुसरे यांचे आऊसाहेब आणि शिवरायांशी घट्ट नाते असल्यामुळे त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान देताना मागेपुढे पाहिले नाहीही शक्ती त्यांना कुठून मिळालीहे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे.”असे दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले. सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! त्यांचं भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचं पराक्रमी पान उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.'

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शनमुळाक्षर प्रोडक्शनपृथ्वीराज प्रोडक्शनराजाऊ प्रोडक्शनपरंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडेदिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरश्रमिक गोजमगुंडेविनोद जावळकरशिवभक्त अनिकेत जावळकरश्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतमृणाल कुलकर्णी आऊसाहेबस्वतः दिग्पाल बहिर्जी नाईक असे कलाकार आहेत. सर्वात वरचढ म्हणजे अजय पूरकर तान्हाजी मालुसरे शोभले आहेत. केवळ नजरेने एखाद्याला गारद करण्याची ताकद तान्हाजींमध्ये होती. अजय पूरकर यांची शरीरयष्टी आणि अभिनय दोन्ही गोष्टी तान्हाजी मालुसरे आपल्यासमोर जिवंत उभे करतात. शूटिंगच्या दरम्यान अजय पुरकर यांच्या पायाला जखम झाली होती. ऍक्शन सीन करताना त्यांच्या अंगठा आणि बोटाच्या मध्ये त्यांचा पाय २ इंच जखम होईल असा फाटला होता. त्याही परिस्थितीत शूटिंग पूर्ण केले होते. तान्हाजीरावांच्या भूमिकेत शिरण्यापूर्वी मी उमरठ येथील सुभेदारांच्या समाधीजवळ डोळे मिटून बसलो होतो. त्यावेळी मी त्यांना तुमचं पूर्ण चरित्र मांडतोय हे सांगितलं. त्या ठिकाणी नतमस्तक झालो आणि त्यांना विचारलं की तुम्हीच सांगा कायकसं करायचं आहे. त्यामुळे मी सुभेदारांनाच विचारुन ही भूमिका साकारली आहे”असेही पुरकर यांनी भूमिका साकारण्यामागची प्रेरणा सांगितली.

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा सिंहगड '(१९२२) –

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंनी आपल्या देशात चित्रपट युगाला  सुरुवात केली तेव्हा ते मुकपट होते परंतु त्यांचा चेहरा प्रामुख्याने पौराणिक होतातर कलामहर्षी बाबूराव पेंटरानी आपल्या सिंहगड चित्रपटाद्वारे १९२२ ला ऐतिहासिक चेहरा दिला. बाबूराव पेंटर यांना शिवचरित्रावरील चित्रपटांचे जनक म्हणावे लागेल,  शिवरायांवर नाटके खूप झाली पण चित्रपट करणारे पहिले बाबूराव पेंटरच. बाबूराव पेंटर यांनी १९२२ साली 'सिंहगडहा पहिला शिवचरित्रपर चित्रपट बनवला. चित्रपट मूक असल्यामुळे कथाविषय सर्वाना माहिती असेल असाच हवा म्हणून कादंबरीकार ह. ना. आपटे यांची १९०३ साली लिहिलेली  'गड आला पण सिंह गेलाही  सुप्रसिद्ध  ऐत्याहासिक कादंबरी निवडली. बाबुरावांच्या या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य केले. हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरल्याने या चित्रपटाला तुफान गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात आली. चित्रपटाच्या उत्पन्नाचे आकडे प्रसिद्ध होत असल्यामुळे यावर सरकारचेही लक्ष गेले आणि या चित्रपटाला पहिल्यांदा 'करमणूक करबसवला व या चित्रपटापासून हिंदुस्थानात तो कायम झाला. पुढे काही वर्षांनी लंडन येथे जागतिक प्रदर्शनात 'सिंहगडहा चित्रपट दाखवला गेलात्यावेळी परीक्षकांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रावर पुढील वाक्य आहे- "This picture is an out standing example of sincerity of direction.

ह्या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका बाबूराव पेंटर यांनी स्वतः केली. त्यांच्या बरोबर तानाजी मालुसरे ( बाळासाहेब यादव )उदयभानू ( झुंजारराव पवार),  शेलार मामा यांची भूमिका २३ वर्षीय व्ही. शांताराम अशा प्रमुख भूमिका होत्या. या सर्व भुमिका इतिहासाच्या पानातून बाहेर आल्यासारख्या वाटत. कल्लेदाढ्यापगडयाकमरची घोंगडी,मुंडासेहातातल्या काठ्यापहरेकऱ्यांच्या खाटापायातल्या जाड तळाच्या वहाणाकानातले मोठे मोठे वाळेहातातली कडी वैगरे सर्व अगदी हुबेहुब असे. हा चित्रपट सिंहगडावर चित्रित करण्याचा बाबुराव पेंटरांचा मानस होता पण पैशाअभावी तो फोल ठरला आणि पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यात आले. बाह्यचित्रीकरणाचा हिन्दुस्थानातला हा पहिलाच प्रयत्न. ऐत्याहासिक लढाया परिणामकारक दिसाव्यात यासाठी कोल्हापुरातील एक वस्ताद बाळासाहेब आणि झुंजारराव यानां शास्त्रोक्त शिक्षणासाठी दररोज येत असे. दांडपट्टाघोडदौडतलवार बाजींचा सराव चालू असताना एके दिवशी अचानक आग आग असा ओरडा ऐकू आला. बाबुरावांच्या स्टुडिओला आग लागली होती आणि ती चहूबाजूला पसरत जाऊन स्टुडिओ खाक झाला. यापूर्वी प्रदर्शित केलेले सैरंध्री,  वत्सलाहरणदामाजी या चित्रपटाच्या लोकमान्य टिळक आणि नटवर्य गणपतराव जोशी यांच्यावरील लघुपटाच्या निगेटिव्ह भक्ष्यस्थानी पडल्या. मात्र एका तगड्या तरुणाने धाडसाने त्या आगीत प्रवेश करीत मोठ्या कष्ठाने बाबुरावांनी स्वतः बनविलेला देशी कॅमेरा वाचविला. आगीची बातमी ऐकून छत्रपती शाहू महाराजही आपल्या खडखड्याचे घोडे दौडवत आले. तर कोल्हापूरचे श्रीमंत सरदार नेसरीकर यानी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भांडवल पुरवण्याचे कबूल केले. हे दु:ख विसरुन बाबुरावानी पन्हाळा किल्ल्यांवर बाह्यचित्रण सुरु केले. पन्हाळ्याच्या तीन दरवाज्यापाशी पाऊणशे मंडळींचा मुक्काम होताचित्रपटात काम करणाऱ्या स्त्रिया पहाटे उठून नास्ता-जेवण करीत तर चित्रपटातले नायक-खलनायक पाणी भरण्याचे तसेच प्रसंगी जेवण वाढप्याचे सुध्दा काम करीत. शुटींग दरम्यानच्या काळात एकदा घोड्याला टाच मारताना घोडे बेफाम झाले आणी बाबुराव घोड्यावरुन खाली पडले. तानाजी कोंढाण्याचा डोणगिरी कडा चढतो आहे अश्या प्रसंगासाठी आजूबाजूच्या गावात सनदी पाठवून पिळदार दोनशे मावळ्यांना हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर मोहिमेवर निघतानाच्या दृश्यात एक वृध्द बाई तानाजीला आशिर्वाद देते हा प्रसंग हुबेहुब येण्यासाठी कुशिरे गावातील एका स्त्रीची निवड केली होती. हातघाईच्या लढाईत तानाजी,सूर्याजी एकत्र दिसावेत यासाठी विशिष्ट् तंत्र वापरुन दिवाळीला लावण्यात येणाऱ्या चंद्राज्योतीच्या दारुचा उपयोग केला तसेच प्रथमच मस्किंगची पध्दत अमलात आणली. सिंहगड मधील शेवटचं लढाईचं दृश्य रात्रीच्या वेळी चित्रित करायचं होतंतानाजी व शेलारमामा घोरपडीच्या आधाराने सिंहगडावर निवडक मावळ्यांसह चढून जातात व किल्ल्याचा दरवाजा उघडून मराठा सैन्याला आत घेताना रात्रीच्या गडद अंधारात लढाईची एकच धुमचक्री चालू होतेमशालीच्या उजेडात ही दृश्ये चित्रीत होऊ शकत नव्हती. शेवटी बाबुराव पेंटरानी एक युक्ती शोधून काढलीदिवाळीला चंद्रज्योत हा दारुकामाचा एक प्रकार पेटवण्यात येतोया चंद्राज्योतीचा खुप लख्ख पांढरा प्रकाश पडतोया चंद्राज्योतीतील दारु दृश्यांच्या आवश्यकतेप्रमाणे एका लांब रांगेत रांगोळी प्रमाणे ठेवून ती मशालीने पेटवून त्या उजेडात लढाईची दृश्ये चित्रीत केली जात. चंद्राज्योतीचा बराचसा धुर वाऱ्याने वाहून जात असे आणी थोडाफार धूर दृश्यावर आला तरी तो मशालीचा धूर आहे असे वाटत असे. रात्रीच्या दृश्यांचे चित्रण विजेच्या दिव्याशिवाय आपल्या देशात पहिल्यांदा हे असं पार पडलं. पेन्टरानी तयार केलेले भव्य ऐतिहासिक देखावे,पडद्यांवर आलेली रोमांचकारी दृश्येउत्कट देशप्रेमाने ओथंबलेले वीररसाचे प्रसंगबाळासाहेब यादवांची नरवीर तानाजीची व झुंजारराव पवारांची उदयभानुची उत्कृष्ट दणदणीत भुमिका यामुळे पुर्वीच्या सर्व मुकपटापेक्षा सिंहगड जास्त लोकप्रिय व लाभदायक झाला. चित्रपट पुर्ण झाल्यानंतर तो पाहण्यासाठी श्रीमंत नेसरीकरश्रीमंत बापुसाहेब इंगळेश्रीमंत कागलकर अशी राजघराण्यातील मान्यवर मंडळी उपस्थीत होती. तेव्हाच्या मुंबईतील नॉव्हेल्टी नाट्यगृहात बाबुरावानी स्वत: रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराज,नरवीर तानाजीउदयभानूमावळे यांची भव्य पोस्टर्स लावली. गेटवर काही लाकडी ऐत्याहासिक प्रसंग उभे केले. त्यामूळे ती पाहाण्यास लोकांची एकच गर्दी उसळली. मुंबईला नॉव्हेल्टी सिनेमागृहात हा चित्रपट सलग सोळा आठवडे चालला होतातो पडद्यावर आला तेव्हा पावसाचे दिवस होतेआणि पावसात या चित्रपटाने सोळा आठवड्याचा रन मिळवला होता हे या चित्रपटाच सर्वात मोठं यश होतंआपल्या देशात चित्रपटांची सुरुवात झाल्यावर इतका लॉंग रन मिळवणारा हा पहिलाच चित्रपटसंपूर्ण मुंबईचे वातावरण शिवकालींन झाले होते. नुकतीच हिंदू-मुस्लिम दंगल शमली होती त्या पार्श्वभुमिवर प्रख्यात म्यॅजेस्टिक टॉकिजने हा चित्रपट नाकारला होता. प्रचंड गर्दी पाहुन पहिल्या खेळाला पोलीसांना पाचारण केले होतेअखेर चित्रपट सुरु झालाटायटल्स सुरु होत पडद्यांवर तानाजी आणि शिवाजी महाराजांचे दर्शन झालेप्रेक्षकानी टाळ्या वाजवून हर हर महादेवसह दोघांच्या नावाच्या उस्फूर्त आरोळ्या सुरु झाल्या. उदयभानूच्या वाराने जेव्हा तानाजी कोसळतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले.

प्रभातच्या चित्रपती व्ही शांताराम यांचा  सिंहगड '(१९३३) –

स्वातंत्र्याचा मंत्र देणारा ऐत्याहासिक 'सिंहगडहा बोलपट काढण्याचे प्रभात फिल्म कंपनीने ठरवले. १९२२ च्या बाबुराव पेंटरांच्या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी शेलारमामांची भूमिका केली होती. पण यावेळी त्यांनी स्वतःला पूर्णपणे पडद्याआड ठेवले. शंकराराव भोसले यांनी या चित्रपटात  तानाजी मालुसरे यांची भूमिका तर कमलकुमारी (लीला चंद्रगिरी)देवलदेवीची (प्रभावती)छत्रपती शिवाजी महाराज (गणपत शिंदे) उदयभानू ( बाबुराव पेंढारकर )बुवासाहेब (घेरेसरनाईक) मा. विनायक (जगतसिंह) केशवराव धायबर (शेलारमामा) यांनी भूमिका अविस्मरणीय केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना शांताराम यांनी नेहमीच्या रुळलेल्या चाकोरीतून न जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने अनेक दृश्य चित्रित केलीरात्रीच्या  लढाईचा  प्रसंग चित्रित करताना त्यांनी अंधारात दोन्ही पक्षांचे तुंबळ युद्ध चालू असताना तोफा डागायचे ठरवलेतोफातून एका पाठोपाठ एक याप्रकारे गोळे बाहेर पडत असताना दारूचा जो प्रकाश पडेलत्या प्रकाशात युद्धाचा प्रकाश व काळोख असा फार गमतीचा खेळ पडद्यावर दिसत होता. ही दृश्ये या चित्रपटाची प्रमुख आकर्षण ठरली. पोवाडा हा संगीतप्रकार या चित्रपटातून प्रथमच पडद्यावर आला. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा जोरात सुरु होता. त्याचवेळी या चित्रपटातून लहरी हैदर यांनी रचलेला पोवाडा 'चल उठ गड्याचल वीर गड्याघेऊन भालाढाल गड्याशूर शिपाई शिवाजीचा तूमर्द मराठा मावळचा या वीरश्रीयुक्त पोवाड्याने जनक्षोभ अधिक उसळत असे. गोविंदराव टेबे यांनी अत्यंत जोशपूर्ण संवाद लिहून अभिनय व संगीताप्रमाणे चित्रपटासाठी लेखणीचं  कसब सिद्ध केलं. जुन्या जमान्यातील हा चित्रपटत्यावेळी विजेच्या दिव्यावर किंवा बंदिस्त साउंड प्रूफ स्टुडिओत चित्रीकरण होत नसे. चित्रपट म्हणावा तेव्हढा गतिमान झाला नव्हता तरीही त्याकाळी 'सिंहगडप्रचंड गाजला आणि त्यातुन प्रभातच्या चालकांना पुढचे रंगीत चित्रपट निर्माण करण्याची उमेद मिळाली.

ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाले यांचा नरवीर तानाजी ' ( १९५२ ) –

मुंबईच्या कोहिनूर टॉकीजचे मालक श्री कान्हेरे यांनी एक ऐत्याहासिक चित्रपट करायचे ठरवले. साहजिकच शिवरायांचा पराक्रमी शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे हा विषय त्यांनी निवडून बाबुराव पैलवान (तानाजी मालुसरे)मा. विठ्ठल (छत्रपती शिवाजी महाराज )दुर्गाबाई खोटे (जिजामाता)रायबा (मदनमोहन ) शेलारमामा (केशवराव धायबर ) यांच्याबरोबर नायिका सुलोचनावसंतराव पैलवान असा कलाकारांचा संच निवडला. बाबुरावांचे व्यक्तिमत्व रांगडे होते. त्यांची पैलवानी देहयष्टी तानाजीच्या भूमिकेला शोभून दिसणारी होती. पण मराठी संवाद बोलण्याची त्यांची बोंब होती. या चित्रपटातील त्यांचे सारे संवाद प्रख्यात गीतकार ग दि माडगूळकर यांच्या आवाजात डब केले गेले. दिग्दर्शक म्हणून राम गबाले यांनी ऐत्याहासिक चित्रपट केला नव्हता. यात लढाया,  कुस्त्यावाघाशी झुंज,  दांडपट्ट्याने हत्तीची सोंड छाटणे असे प्रसंग चित्रित करायचे होते. भगवानदादा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरणाला सुरुवात झाली. हत्तीची सोंड कापण्याच्या प्रसंगासाठी हत्ती पाहिजे होताग दि माडगूळकर यांच्या ओळखीने औंध संस्थानाचा हत्ती मिळाला. हत्ती व्ही.आय.पी असल्याने त्याचं खाणं -पिणंराहाणे आणि माहुताची बडदास्त ठेवली गेली होती. स्टुडिओमध्येच उदयभानूच्या वाड्याचा मोठा सेट उभारला होता. रात्रीचा सीन होता. लढाई चालू असताना तानाजी दांडपट्टा चालवीत सपासप शत्रूसैन्य कापत हटवत येतो. लढाई अगदी निकारावर आल्यावर उदयभानु हत्तीवर स्वार होऊन तानाजीच्या दिशेने अंगावर येत असताना तानाजी हत्तीची सोंड हातात धरून कापतोखरे तर तो प्रसंग अवघड होता. त्या काळात आतासारख्या स्पेशल इफेक्टच्या सोयीचा अभाव होताट्रकच्या टायरची ट्यूब कापून सोंडेसारखी हत्तीच्या सोंडेला दुमडून बांधली होती. सर्व तयारी झाली. माहूत त्याच्या भाषेत हत्तीला चुचकारत होता. हत्तीनं पळत येणं आणि तानाजीने सुरक्षित अंतरापर्यंत दांडपट्टा फिरवीत जाणे एव्हढाच शॉट हवा होतासर्व तयारी झालीतानाजी ठरलेल्या अंतरापर्यंत आला आणि हत्तीने एकदम रागावून हे काय बांधलयया भावनेने पक्की बांधलेली इनर ट्यूब रागाने उडवून टाकली आणि नासधूस करू लागला. दुसरा प्रसंग तानाजी जंगलात वाघाशी सामना करतो असा सीन होता. त्यासाठी शिकाऊ वाघ कुठे मिळेल तिथे जायचं ठरलं. पंढरपूरच्या सर्कशीत असा वाघ आहे असे समजल्यानंतर चित्रपटाचा चमू तिकडे गेला. एका बंदिस्त धर्मशाळेत झाडांच्या फांद्यामोठमोठे दगड लावून जंगलाचा देखावा उभा करून सेट उभारला. वाघाच्या रिंगमास्टरला तानाजी सारखे केसभरदार मिश्याकपडेडोक्यावर मराठेशाही पगडीवैगरे वेशभूषा करून तयार ठेवला. वाघाचे स्वतंत्र आणि एकत्र शॉट्स घ्यायची योजना पक्की केली. कॅमेराच्या लेन्सपुरती मोकळी जागा ठेऊन डुप्लिकेट तानाजी आत सोडला. वाघाने रिंगमास्टरला आवाजावरून ओळखले परंतु आपला हा रोजचा भिडू आज हे काय करून आलाय म्हणून वाघाने डरकाळी फोडत त्याची पगडी आणि केसांचा विग उडवून दिला. मात्र पुढे बाबुराव पेहेलवानांच्या सोबत हवे तसे शॉट्स चित्रित झाले. चित्रीकरण संपल्यानंतर सर्कशीच्या चमूला एक ग्रुप फोटो काढायचा होतावाघ मध्ये आणि त्याच्या बाजूला तो रिंगमास्टर उभा राहिला. नेहमी फोटोमध्ये मध्यभागी महत्वाच्या जागी उभे राहणारे मान्यवर यावेळी मात्र फोटोत दूर दूर उभे राहिले. हा चित्रपट सुद्धा भरपूर चालला.

अजय देवगण-ओम राऊत यांचा ‘तान्हाजी: द अनसंग  वॉरियर’ (२०२०)  -

'हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे काअशा दमदार डायलॉगसह 'तानाजी : द अनसंग वॉरियरहा हिंदी बहुचरर्चित  चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शित करण्यात आला. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा आधुनिक तंत्रज्ञान वापरुन बनवली होती. अंगावर शहारे आणणारी दृश्ये  चित्रपटात  साकारण्यात आलीतान्हाजींचे जीवन आणि त्यांनी मुघलांवर मिळवलेला विजय 3 डी प्रसंगांतून ७० एमएम पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्री काजोलने तानाजीच्या पत्नीची सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना कपाळी ठसठशीत कुंकूनाकात नथडोक्यावर पदर आणि करारी नजर अशा तिच्या मराठमोळ्या लुकचं तुफान कौतुक झाले होते. तसेच अभिनेता शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तर कोंढाण्याचा अधिकारी असणाऱ्या उदयभानू राठोडची भूमिका सैफ अली खान याने केली.  १५० कोटी रुपयांचा  बजेट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले होते. सिनेमाविषयी बोलताना अजय देवगन म्हणाले होते कीभारताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या तान्हाजीसारख्या शूरवीराची कहाणी सादर करताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. मला ही कथा आपल्या देशाच्या नव्हे तर जगाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली पहायची आहे.” आणि तसेच घडले. संपूर्ण भारतातील सर्व प्रांतातील  सर्वभाषिकांनी या चित्रपटाचे उस्फुर्त स्वागत केले. त्यामुळे या चित्रपटाने ३०० करोडहून अधिक कमाई केली होती.

रवींद्र मालुसरे

अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने